Tuesday, November 12, 2019

महाराष्ट्रपटी राजवट...!


राष्ट्रपती राजवट देशाचा इतिहास
भारतीय घटनेत कलम 352 ते 360 पर्यंतच्या आपत्कालीन तरतुदींविषयी तरतूद आहे. 1950 ते 2018 या काळात भारतात 125 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 1951 मध्ये पंजाबमध्ये भारतात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आतापर्यंत, जवळजवळ सर्व राज्यात 1 किंवा अधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.


महाराष्ट्रात कधी राष्ट्रपटी राजवट लागू झाली होती ?
    महाराष्ट्रात आजवर दोनदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 1980 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्रातील पुलोद सरकार बरखास्त केले होते. त्यानंतर 2014 साली आघाडी सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे राज्यात निवडणुकीच्या तोंडावर अगदी अल्पकाळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

राष्ट्रपटी राजवट कधी लागू होते ?
"बहुमत सिद्ध न करता येणं, एखाद्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, सरकारमधील गटांमध्ये संघर्ष होऊन बहुमत गमावणं अशामुळे सरकार बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या घटना घडल्या आहेत. पण सरकारच अस्तित्वात न आल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची उदाहरणं नाहीत. केवळ राजस्थानमध्ये 1967मध्ये अशी घटना घडली होती", असं ते म्हणाले.

राष्ट्रपटी राजवटीत नेमके काय होईल ?

1.  नवीन योजना, कल्याणकारी योजना जाहीर करता येत नाहीत.
2. जीवनावश्यक प्रश्नांवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपालांना असतात, म्हणजे शेतकरी आत्महत्यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर ते निर्णय घेऊ शकतात.
3.  राष्ट्रपती राजवटीत राज्याचे सर्व अधिकार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे एकवटतात.
4.  या काळात राज्य नाममात्र चालवण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
5.  आधीच्या मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या कारणांसाठी - खर्चांसाठी मार्चपर्यंत तरतूद करण्यात आलेली असते. त्यामुळे ते खर्च केले जाऊ शकतात, पण नवीन कोणतेही खर्च करण्याचा अधिकार राज्यपालांना नसतो.
6.  राज्यपालांच्या सूचनेवरून केंद्र सरकार याबाबतचे बरेच निर्णय घेऊ शकतं, म्हणजेच पूर्ण शासन व्यवस्था ही राज्यपालांच्या मार्फत चालते.
7.  या कालावधीत निर्णय घेण्याचे अधिकार संसदेकडे जातात.
8.  या काळापुरती विधानसभा स्थगित होते. ही राष्ट्रपती राजवट 2 महिन्यांच्या काळापुरती राहू शकते.
9.  त्यानंतर राजवटीचा कालावधी वाढवायचा असेल तर केंद्र सरकार संसदेत तसा ठराव मांडतं. हा ठराव मंजूर झाल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.
10.  या कालावधीत राज्यपाल हे राज्याचे मुख्य सचिव आणि काही सनदी अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्याचा कारभार पहातात.


Wrote By - Pankaj Tribhuvan 
Note : Images and contents used for knowledge purpose only.

Tuesday, August 6, 2019

मी कोण आहे - नौकर ? - Who Am I - Employee ?






मला असे वाटते , की या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती 3 गोष्टीसाठी धडपड करतो.
1.       पैसा  -  Money
2.       वेळ – Freedom ( Time)
3.       दर्जदार जिवन – Quality Lifestyle.

  मी खाली माझ्या निरिक्षणातुन तसेच अभ्यासातुन काही प्रकारच्या लोकांचे उदाहरणे दिली आहेत.
त्यातुन समजुन घ्या आपण कोणत्या गटां मोडतो ?

आपल्याला चार प्रकारचे लोक समजात भेटतील.
यात मी सरकारी कर्मचार्याबद्द्ल उल्लेख केलेला नाही.
अ.     Employee – नोकर -  या गटांतील लोक दुसर्यांना श्रिमंत बनवण्यात धन्यता मानतात. हे पगारांवर कामे करतात.
या गटांतील लोकांवर नेहमी पैशाची चणचण भासत असते.

आ.   Self- Employee – स्वता: मालक / स्वता: नौकर : या गटांतील लोक स्वता:ला श्रिमंत बनवण्यात प्रयत्नशील असतात. या गटांतील लोक नौकर व मालाकापेक्षाही प्रत्यक्षात जास्त कामे करतात. या गटांतील लोक विवीध Services सेवामध्ये पार्टनर म्हणुनही कामे करतात.

या गटांतील लोकांकडे नेहमी वेळ नसते किंवा वेळेचा अभाव असतो.

इ.       Businessman – मालक : या गटांतील लोक स्वताला श्रिमंत बनवण्यात यशस्वी होतात. हे पगारांवर कामे करुण घेतात. बाजारात एखाद्या सेवेची व प्रोडक्टची हे लोक सेवा पुरवतात, व त्या सेवेतुन चांगले नफा मिळवतात. पण प्रत्यक्षामध्ये हे स्वता कमी काम करुन आपल्या नौकरा कडुन कामे करुन घेता व त्याना पगार पुरवतात.

या गटांतील लोकांकडे पैसा तसेच वेळ ही असतोच.


ई.       Investor : गुंतवणुकदार -  या गटांतील लोक समाजामध्ये खुप थोडे आहे. पण हे वरच्या तीन्ही गटांतील लोकानपेक्षा जास्त श्रिमंत असतात. हे लोक विवीध व्यवसायमध्ये पैसे गुंतवतात. व त्या व्यवसायामधुन होणार्या नफ्याचे वाट्यात ते सहभागी असतात.
जगातील जवळपास सर्वच श्रिमंत व्यक्ती हे गुंतवणुकदार आहे.

या गटांतील लोकांकडे पैसा तसेच वेळ ही असतोच.
पण हे लोक दर्जेदार जिवन ही जगत असतात.
हे लोक सामाजिक योगदानात अग्रेसर असतात. आणि यात ते धन्यता मानतात.

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌_______________________________________________________________
मला असे वाटते आपण स्वतासाठी , कुंटुबासाठी , समाजासाठी स्वताच्या प्रगतीकडे काळजीपुर्वक लक्ष देण गरजेचे आहे.

आपण ही योग्य त्या जाग्रुत चित्त्ताने आपला गट (वरिल मी मांडलेले) कष्टाने बदलु शकतो.
आपल्या कुंटुबाची , समाजाची , देशाची प्रगती ही आपल्या वैयक्तिक प्रगतीवर अवलंबुन असते.
म्हणुन आपण स्वताला अगोदर प्रगत करणे महत्वाचे ठरेल.



Wrote By - Mr. Pankaj Chandrabhan Tribhuvan.
Note : Images are used only for Knowledge purpose .

Monday, August 5, 2019

कलम ३७० काय होती ?




काय होते विशेष अधिकार ?
  •  कलम ३७० नुसार , संसदेला जम्मू-कश्मीर च्या विषयी रक्षा , विदेश आणि संचार च्या विषयी कायदा बनविण्याचा अधिकार होता. परंतु या व्यतीरिक्त संबंधीचे कायदे बनविण्यासाठी केंद्राला राज्य सरकारच्या परवानगीची गरज लागत होती.
  •    वरिल विशेष दर्जे नुसार जम्मू-कश्मीर राज्यांमध्ये संविधानाची कलम ३५६ लागु होत नव्हती.
  •          यामुळे राष्ट्रपतींकडे जम्मू-कश्मीर राज्याचे संविधान बर्ख़ास्त करण्याचा अधिकार नव्हता.
  •    १९७६ चा शहरी भूमि क़ानून जम्मू-कश्मीर मध्ये लागु होत नव्हता.       
  •    या कायद्या नुसार भारताचा नागरीक जम्मू-कश्मीर मध्ये जमिन खरिदी शकत नव्हते.
  •    भारतीय संविधान की धारा 360 ज्यानुसार मध्ये Emergency लागु केली जाऊ शकते, पण तो कायदा       जम्मू-कश्मीर लागू होत नव्हता.
  •         स्वंतत्र्यच्यावेळी जम्मू-कश्मीर याला भारतामध्ये विलीन करने खुप महत्वाचे होते.या कारणामुळे जम्मू-       कश्मीर ला कलम ३७० नुसार विशेष राज्य व काही विशेष अधिकार देण्यात आले होते.
 


खालील पैकी काही विशेष अधिकार होते :

  1.     जम्मू-कश्मीर च्या नागरिकांना दोन नागरिक्तव होते.
  2.     जम्मू-कश्मीर चा राष्ट्रध्वज हा वेगळा होता.
  3.     भारतातील इतर राज्यांमध्ये विधानसभा कार्यकाळ ५ वर्ष असतो, तर जम्मू-कश्मीर मध्ये ६ वर्ष होता.   
  4.     जम्मू-कश्मीर मध्ये राष्ट्रध्वज व इतर राष्ट्रीय प्रतिकाचा अपमान गुन्हा मानला जात नव्हता.
  5.     भारतातील उच्च न्यायालयाचे आदेश जम्मू-कश्मीर मध्ये मान्य केले जात नव्हते.   
  6.     जम्मू-कश्मीर च्या महीले ने जर भारतातील इतर राज्यातील व्यक्तीशी लग्न केले तर तिचे जम्मू-कश्मीर चे नागरिकत्व रद्द होत होते, पण जर तिने पाकिस्तान मधील एखाद्या व्यक्तीशी लग्न केले तर त्याला ही जम्मू-कश्मीर चे नागरीकत्व प्राप्त होत होते.
  7.        काश्मिर मध्ये महीलांवर शरियत कायदा लागु होत होता.
  8.     काश्मीर मध्ये आरटीआई (RTI) और सीएजी (CAG) हे कायदे कलम ३७० मुळे लागु होत नव्हती.
  9.     काश्मीर मध्ये अल्पसंख्यक [हिन्दू-सिख] लोकांना 16% आरक्षण मिळत नव्हते.
  10.        काश्मीर मध्ये इतर राज्यातील लोक जमिन खरेदी करु शकत नव्हते.
  11.        काश्मीर मध्ये पाकिस्तानी लोकांना सुध्दा भारतीय नागरिकत्व मिळत होते. 
  12.     भारतीय संसद खुप कमी क्षेत्रां मर्यादीतच कायदे बनवु शकत होती.



Wrote By  - Mr. Pankaj Tribhuvan

Reference - Google , Wikipedia.
Note - Images used only for Knowledge purpose, All credits goes to creator.




10 गोष्टी ज्या आपल्याला शाळेत शिकवल्या जात नाहीत.








      How to sell

सेल – म्हणजे केवळ विकणे नसुन स्वताला Represent करणे असा ही अर्थ आपण लावु शकतो.
आपण काही काम करत असु आपणास स्वताला Represent करावच लागत.
आपण जॉब करत असाल तर आपल्याला बॉसला सुध्दा Prove करुन दाखावे लागते.
आपण एक युवा असाल तर आपल्याला पार्टनरवर छाप सोडावीच लागते.
हे सर्व काही स्वताला Represent करणे किंवा विकणेच नव्हे काय ?

         
          How to think

विचार कसा करायचा ?
आपल्याला शाळेत,कॉलेजमध्ये Science , Math,Physics,Chemistry, Sociology, etc…
हे विषय तर खुप छान रितिने शिकवले जातात.
पण चांगला विचार कसा करायचा ?
वाईट विचारांना कसे हाताळायचे ?
याचे प्रशिक्षण मात्र दिले जात नाही.
पण मात्र नेहमी चांगला विचार करा , असा बोचरे सल्ले मात्र दिले जातात.



How to Negotiate

Negotiate – म्हणजे भाव करणे, तोलमोल करणे , वाटाघाटी करणे इतर....
दैनदिन जिवनात या कौशल्याची आपल्याला खुपच गरज लागत असते.
पण दुर्दैवाने हे कौशल्य किंवा कला आपल्याला शाळेत,कॉलेजमध्ये शिकवलीच जात नाही.
संवाद, चिकाटी अशे अनेक गुण या कौशल्यातुन अवगत होतात.
म्हणुन हि कला शाळेत,कॉलेजमध्ये शिकवले जाणे गरजेचे आहे.
     





      How to face failure


Failure – म्हणजेच अपयश होय.
अपयश ही यशाची पहीली पायरी आहे.
पण समाजामध्ये अपयशकडे बघण्याचा द्रुष्टिकोण हा खुपच वाइट आहे.
आपण बघतो की अपयशी लोकाना समाजातील काही दुष्ट लोक खुप हिनवतात, चिडवतात, कमी लेखतात.
अपयशी लोकाना समजात हिनवले जाते.
यातुन अपयशी लोक निराश होतात,त्यात ते चिंताग्रस्त होऊ शकतात,
काही अपयशी लोक यातुन मार्ग ही काढतात तर काही नैराश्याचे शिकार होतात.
यातुन खचुन गेलेले तर आपण खुप उदाहरणे बघतोच.
आपल्याला शाळेत,कॉलेजमध्ये यावर मात करण्यासाठी काही कार्यशाळा होणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना परिक्षेमध्ये, युवकांना व्यवसायामध्ये अपयश येणे ही एक सामान्य गोष्ट आहे.
यातुन काय मार्ग काढायचा ?
यातुन कसा मार्ग काढायचा ?

याचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

      How to manage time

Time – वेळ या शब्दाचा अर्थ मला सांगण्याची काही गरज नाही.
आजच्या जगात वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थ्याना वेळेचे तर भानच राहत नाही.
परिणामी त्याच्या वैयक्तिक , माणसिक गोष्टींवर परीणाम दिसुन येताय.
त्याच बरोबर विद्यार्थाना व युवकाना वेळेचे नियोजण करता येत नाही.

वेळेवर काम करणे याचे फायदे मला काही सांगयची गरज नाही.
मला वाटते वेळेचे नियोजण या विषयावर आपल्याला शाळेत,कॉलेजमध्ये कार्यशाळा होणे आवश्यक आहे.

How to Invest Money

Invest - गुंतवणुक
केवळ पैसाच नव्हे तर वेळ पण योग्य त्या ठिकाणी गुंतवणुक कसा करावे हे युवकांना शिकवणे आज गरजेचे झाले आहे.
आज आपल्या शैक्षणिक पध्दतीत मध्ये शिक्षण हे केवळ नोकरी मिळण्यासाठी केले जातेय.
जो पर्यत शिक्षणांचा उदेश्य हा केवळ नोकरी मिळवण्याचा असेल तो पर्यत समाजात केवळ नोकरच तयार होतील.
आपल्या युवकांना अशा शिक्षणाची गरज आहे ज्यातुन ते व्यवसाय , गुंतवणुक अशा गोष्टिंकडे वळतील.
जेणे करुण समाजात नोकर नाही तर मालक व गुंतवणुकदार तयार होतील.
युवकांना व्यवसाय , गुंतवणुक अशा गोष्टिंचे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

Principle of Success

Success – यश याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते.
उदा.
एक व्यवसायिकासाठी भरघोस नफ्फा हे त्याच्यासाठी यश असु शकते.
एक विद्यार्थासाठी परिक्षेमधील चांगले मार्क हे यश असु शकते.
एक स्पर्धा परिक्षेमध्ये भाग घेणार्या युवकासाठी त्याची निवड होणे यश असु शकते.

म्हणजेच यश हे सर्वांसाठी सारखे नसुन तो एक माणसिक अनुभव आहे असे मला वाटते.
आणि यश मिळवण्यासाठी खुप सारे तत्व आहेत


ज्यात प्रामुख्याने
1.   नियमितता
2.   आत्मविश्वास
3.   चिकाटी
4.   कधि न हार मानन्याची व्रुत्ती
5.   हारले तरीही त्यातुन धडा घेण्याची सवय
6.   चांगल्या वातावरणाचा सहवास(Environment)
7.   चांगल्या सवयी
अजुन खुप काही ...
ह्या सर्व गोष्टीचा सराव घेणे सुध्दा आवश्यक आहे.
यासाठी शाळेत,कॉलेजमध्ये कार्यशाळा मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

How to find your Passion

Passion – आवड –
विद्यार्थी दशेत असतानाच विद्यार्थाना आपली आवड माहीती करुन देणे किती मोलाचे असेल हे मला विशेष करुन सांगायचे.
विद्यार्था शाळेतुन महाविद्यालयात प्रवेश घेताना केवळ आपली आवड माहीती नसल्यामुळे चुकिच्या शाखेत प्रवेश घेतात.

त्यात काहींना आपल्या जिवनाचा उद्देश ( Goal ) माहीतीच नसतो.
केवळ माझा मित्र व मैत्रिण science ला अ‍ॅडमिशन घेतोय म्ह्णुन मी हि घेतोय अशे हि महाभाग असतात.
यात काही दोश पालकांचा ही असतो, काही पालक विद्यार्थाचा विचार न करता , त्याच्या आवडी निवडीचा विचार न करता , विद्यार्थाचे त्याच्या मनाप्रमाणे अ‍ॅडमिशन करुन देतात.
परिणामी विद्यार्थाची गुणवत्ता खालावते.
यासाठी शाळेत,कॉलेजमध्ये विद्यार्थाचे तसेच पालकांची कार्यशाळा व मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.
जेणे करुण विद्यार्थी आपल्या आवडी प्रमाणे शिक्षण घेऊ शकतील.


How to handle money

Money – पैसा
पैसा या शब्दाला आपली एक वेगळीच व्याख्या आहे.
जगातील ९९% पैसा हा केवळ 1 % लोकाकडे आहे. आणि तेच लोक जगावर नियंत्रण करतात.
आपण सकाळी उठल्यापासुन (कोणत्या कंपनीचे Toothpaste वापरले पाहिजे) तर झोपे पर्यत (कोणते मच्छर कॉइल वापरली पाहिजे ) हे सर्व हे श्रिमंत लोक ठरवतात.
असे म्हणतात ना की पैसा सर्व काही नसतो पण पैशाच्या वाचुन ही खुप कामे अडतात.
उदा.
आपण किती चांगले बोलणारे व्यक्ती असा कोणाला पैशाची गरज भासली तर तुमचे बोलणे काही कामाचे नसते.
तुम्ही कीती चांगले व्यक्ती असले , पण तुमच्या मुलांना मोठ्या शाळेमध्ये अ‍ॅडमिशन करावयचे असेल तर तुमचा चांगुलपणा काही कामाचा नसतो.
अशे खुप कामे आहे जे केवळ पैशामुळेच अडते.

मला वाटते , आज प्रत्येक शाळेत,कॉलेजमध्ये पैशाबाबत व्यवहारिक ज्ञान देणे आवस्यक आहे.
पैसा कसा कमवायचा ? ( Active Money / Passive Money)
कीती कमवायचा ? ( Turnover / Monthly Payments)
कधी कमवायचा ? ( For students First Learning then Earning)
कोणासाठी कमवायचा ? (For help to needy , For Quality lifestyle etc…)

वरिल सर्व गोष्टीवर शाळेत,कॉलेजमध्ये विद्यार्थाचे तसेच पालकांची कार्यशाळा व मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

How to start a Business


Business – व्यवसाय
जो पर्यत शिक्षणांचा उदेश्य हा केवळ नोकरी मिळवण्याचा असेल तो पर्यत समाजात केवळ नोकरच तयार होतील.
मला असे वाटते ,नौकरी करुन आपण एक कुंटुबाचे पोषण तर करु शकु पण जर पुढच्या पिढ्या घडवायच्या असेल तर व्यवसायाशिवाय पर्यायच नाही.
शाळेत,कॉलेजमध्ये विद्यार्थाचे तसेच पालकांची कार्यशाळा व मार्गदर्शन होणे आवश्यक आहे,तसेच सरकारी योजनाचाही आढावा देत, विद्यार्थाना तसेच युवकाना व्यवसयासाठी प्रोत्साहन देणे आवस्यक आहे.



Wrote By - Pankaj Tribhuvan


Note : All images used only for knowledge purpose.